वेब टीम
नवी दिल्ली – भारत-बांगलादेश यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला य नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना 3 नोव्हेंबरला नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान दिल्लीतील सामन्यावरून सध्या वादंग सुरू आहेत. कारण दिल्लीत हवेतले पोल्युटंट प्रचंड वाढले आहेत.
बांगलादेशचे प्रशिक्षक रसेल डोमिंगोयांनी दिल्लीमध्ये होणाऱ्या टी-20 सामन्यावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. सध्या बांगलादेशचा संघ कोटलामध्ये मास्क परिधान करून सराव करत आहेत. याबाबत डोमिंगो यांनी, “प्रदूषणामुळं कोणी मरणार नाही आहे. प्रदूषण आमच्या देशातही आहे. त्यामुळं दिल्लीतील दुषित हवा आमच्यासाठी मोठी गोष्ट नाही. कारण जगातल्या सर्व देशांमध्ये ही समस्या आहे”, असे सांगितले.