banner 728x90

कार्यकर्त्यांना बळ देणारा अजातशत्रू नेता.…

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

banner 325x300

पदं मिळाली, मोठेपण मिळालं, की ज्या समाजातून आपण आलो, त्याचा विसर पडण्याची वृत्ती असते. आ. राजेंद्र गावित त्याला अपवाद आहेत. मिळालेल्या सत्तेचा फायदा सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा, अडल्या नडलेल्यांना मदत करायची, मतदारसंघाचे प्रश्न मांडताना व्यापक दृष्टी ठेवायची, हे आ. गावित यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

समता,बंधुता मनी नांदावी
असा असावा अमुचा नेता!
अभिमान वाटावा देशास साऱ्या
त्याचे नाव मुखी घेता!
या काव्यपंक्ती आ. राजेंद्र गावित यांना तंतोतंत लागू होतात. पराभवानं नाऊमेद व्हायचं नाही, विजयाची हवा डोक्यात जाऊ द्यायची नाही आणि पदं गेलं, तरी बेहत्तर प्रामाणिकपणा सोडायचा नाही, हे दुर्मिळ गुण आ. गावित यांच्या अंगी आहेत. मंत्री, खासदार, आमदार अशी कितीही पदं मिळाली, तरी त्यांनी अजून त्यांच्यातलं सामान्यत्व कायम जपलं आहे. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीचे शिल्पकार असलेल्या आ. गावित यांना आता पालघर जिल्ह्याच्या विकासाचं शिल्पकार व्हायचं आहे. वेगवेगळी पदं भूषवल्यानं त्यांना कामं कशी करून घ्यायची, माणसं कशी जपायची आणि मतदारसंघापुरता विचार न करता जिल्ह्याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार कसा करायचा, याचं बाळकडू मिळालं आहे. एक चांगला नेता होण्यासाठी काही आवश्यक गुण आणि कौशल्यं असावी लागतात. त्यामध्ये स्पष्ट दृष्टी, प्रभावी संवाद कौशल्यं, इतरांना प्रेरित करण्याची क्षमता आणि नैतिक आचरण यांचा समावेश होतो. नेता म्हणजे केवळ एक पद नाही, तर ती एक जबाबदारी आहे, याची जाणीव आ. गावित यांना आहे. पालघर जिल्हा सागरी, नागरी आणि डोंगरी अशा तीनही भागात विभागला आहे. या जिल्ह्यात यश मिळवायचं असेल, तर या तीनही भागाला सामावून घेणारं नेतृत्वच जिल्ह्यात यशस्वी होतं. गावित यांना हे यश मिळालं आहे.

सुरुवातीचे काही पराभव जरी वाट्याला आले असले, तरी त्यांची काम करण्याची पद्धत, लोकांशी सातत्यानं संपर्क आणि पराभव झाला, म्हणजे कामाची जबाबदारी आपली नाही, अशी वृत्ती नसणं यामुळं लोकांनाही आपली चूक कळाली आणि गावित यांना नंतर मतदारांनी स्वीकारलं. अलिकडच्या काही निवडणुकीत तर पालघरच्या जनतेला पक्ष कोणता यापेक्षा गावित हाच एक पक्ष असल्याचं वाटतं आणि भरभरून प्रेम करणारे लोक मग गावित यांच्यावर मतांचा वर्षाव करतात. सतत काही वर्षे सत्तेत राहिलं, की मग्रुरी येते. लोकांशी असलेली नाळ तुटते; परंतु गावित त्याला अपवाद राहिले. त्यांनी मतदारांशी असलेली नाळ कायम ठेवली. लोकांत रमणारा नेता आणि सत्तेसोबत राहूनही साधेपणा कायम ठेवलेला नेता म्हणून त्यांची प्रतिमा उंचावत गेली.


नेत्यानं भविष्यासाठी एक स्पष्ट दृष्टी आणि ध्येय ठेवणं आवश्यक आहे. लोकांना काय अपेक्षित आहे आणि आपण त्यांना कुठं घेऊन जायचं आहे, हे त्याना माहीत असलं पाहिजे. गावित या निकषाला तंतोतंत उतरतात. त्यांना पालघरच्या जनतेला काय हवं आहे, पालघरला जगाच्या नकाशावर कसं न्यायचं आहे आणि विकासात त्यांना कसं सामावून घ्यायचं आहे, हे त्यांना चांगलं ज्ञात आहे. विकासाचा रथ पुढं नेताना पालघर जिल्ह्यातील आदिवासी, कष्टकरी, मच्छीमार तसंच अन्य समाज घटकांवर परांगदा होण्याची वेळ येणार नाही, यावर त्यांचं लक्ष असतं. नेत्यानं आपले विचार, योजना आणि अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त करणं आवश्यक असतं. परिणामांची पर्वा न करता लोकांच्या हिताचं काय आहे, हे सांगितलं पाहिजे. गावित त्यात चपखल बसतात. त्यांनी अनेकदा आपली मतं निर्भीडपणे मांडली आहेत. संवाद प्रभावी असेल, तर लोकांना काय अपेक्षित आहे, हे समजतं आणि ते अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात. गावित यांना आदिवासी, मच्छीमार आणि नागरी भागातील लोक यांच्यांशी उत्तम संवाद साधण्याची कला अवगत आहे. नेत्यानं आपल्या कार्यसंघाला प्रेरित करणं आवश्यक असतं. त्यांना प्रोत्साहित करणं, त्यांच्यात उत्साह निर्माण करणं आणि त्यांना त्यांचे सर्वोत्तम कार्य करण्यासाठी प्रेरित करणे, हे नेत्याचं कर्तव्य असतं. मोठ्या संस्था ताब्यात नसताना आणि आर्थिक शक्ती मागं नसताना गावित यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांची फौज बांधली आहे. कार्यकर्त्यांची ही फळी पक्ष कोणता हे न पाहता गावित हाच पक्ष समजून काम करते आणि त्यामुळं गावित यांना सातत्यानं यश मिळत गेलं. नेत्यानं नेहमी नैतिक आणि सचोटीनं वागणं आवश्यक आहे. नेत्यानं आपल्या निर्णयांची आणि कृतींची जबाबदारी घेणं आवश्यक असतं. आ.राजेंद्र गावित ही जबाबदारी लीलया पेलतात. आपली कामं, त्याबाबतचे निर्णय आणि त्याची जबाबदारीही तेच घेत असतात. आमदार असले, तरी केंद्रीय पातळीवरचे काही प्रश्न असले, तरी त्यांना केंद्रात काम करण्याचा अनुभव असल्यानं ते तिथं मांडतात. विविध पातळ्यांवर पत्रव्यवहार करणं, पाठपुरावा करणं आणि ते सुटेपर्यंत त्यासाठी प्रयत्न करणं हे त्यांचा स्थायीभाव झाला आहे. नेत्यानं एकटं मोठं झालं आणि कार्यकर्ते आहे तसेच राहिले, तर ते नेतृत्वाचं अपयश असतं. असा नेता यशस्वी होत नाही. आ. गावित त्याला अपवाद आहेत. सत्तेच्या विविध पायऱ्या चढताना त्यांनी कार्यकर्त्यांची फळी घडवली. त्यामुळं गावित यांना सातत्यानं विजयी करण्यासाठी ही फळी झटत असते. महाभारतात सांगितल्याप्रमाणं फळाची अपेक्षा न करता काम करणं सोपं नसतं; परंतु नेता जीवाला जीव देणारा असला, तर कार्यकर्तेही तसेच असतात. गावित यांना असे कार्यकर्ते मिळणं हे त्यांचं भाग्य आहे. नेत्यानं आपल्या कार्यसंघातील सदस्यांना सक्षम बनवणं आवश्यक असतं. त्यांना आवश्यक कौशल्यं आणि ज्ञान देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आवश्यक आहे. गावित त्याबाबत अजिबात मागं नाहीत.


नेत्यानं नेहमी नवीन गोष्टी शिकायला तयार असलं पाहिजे. सतत शिकणं आणि स्वतःला सुधारणं, हे एक चांगला नेता होण्यासाठी आवश्यक आहे. आ. गावित सातत्यानं स्वतःला राजकारणातला विद्यार्थी मानून एक एक धडा घालून देत असतात. बोगस आदिवासींच्या प्रश्नावर आणि आदिवासींच्या संरक्षणबाबत त्यांनी विधानसभेत केलेलं भाषण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आवडलं. आ. गावित यांनी आदिवासी हक्कांच्या विविध कायद्यांचे दिलेले संदर्भ ऐकून बावनकुळे यांनी स्वतःच आ. गावित यांनी आपलं उत्तराचं काम सोपं केल्याचं सांगितलं. आ. गावित यांनी दिलेली आकडेवारीच त्यांनी उद्‌धृत केली. नेत्यानं कठीण परिस्थितीतही धैर्य आणि दृढनिश्चय दाखवणं आवश्यक असतं. नेत्यानं समोर येणाऱ्या समस्यांचं प्रभावीपणे निराकरण करणं आवश्यक असतं. आ. गावित या कसोटीला पूर्णतः उतरले आहेत. नेत्यानं आपल्या कार्यसंघासोबत चांगले संबंध ठेवणं आवश्यक आहे आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणं आवश्यक आहे. आ. गावित तसं करतात. एक चांगला नेता होण्यासाठी या सर्व गुणांचा विकास करणं आवश्यक आहे. हे सर्व गुण एका रात्रीत विकसित होत नाहीत; परंतु कठोर परिश्रम आणि समर्पणाने ते प्राप्त केले जाऊ शकतात. एखाद्या व्यक्तीला नेता बनवण्याचं कारण त्याच्या पदावर अवलंबून नसतं, तर त्याच्यात असलेले गुण आणि पद्धती असतात. नेतृत्व हे केवळ एका पदापेक्षा बरंच काही असतं; ते कृती, वर्तन आणि इतरांना प्रेरणा देण्याची क्षमता असते. जर कोणी काही प्रमुख गुण आत्मसात केलं आणि सातत्यानं त्यांचा सराव केला तर तो चांगला नेता होऊ शकतो, हे आ. गावित यांनी दाखवून दिलं आहे. नेतृत्व म्हणजे लोकांच्या गटाला एक समान ध्येय साध्य करण्यासाठी कार्य करण्यास प्रेरित करण्याची कला. ती म्हणजे इतरांना प्रेरणा देण्याची आणि त्यांच्यावर प्रभाव पाडण्याची क्षमता, त्यांना अशा दिशेनं मार्गदर्शन करणं जे त्यांना वाढण्यास मदत करतं आणि त्याचबरोबर संस्थेची उद्दिष्टं साध्य करतं. खरं नेतृत्व केवळ कार्ये व्यवस्थापित करण्याच्या कृतीपलीकडे जाते; त्यात एक दृष्टीकोन जोपासणं, विश्वास निर्माण करणं आणि सहयोगी वातावरणाला प्रोत्साहन देणं समाविष्ट आहे. प्रभावी नेतृत्व अनेक रूपं घेऊ शकतं. पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षांना आ. गावित हेच हवेहवेसे उमेदवार वाटतात. त्यामागं वेगवेगळी कारणं दडलेली आहेत. नंदुरबार येथील मूळ निवासी असणारे राजेंद्र गावित हे विद्यार्थी दशेत सेवा दलाच्या चळवळीशी संपर्कात होते. मिरारोड येथे गॅस एजन्सी मिळाल्यानं ते त्या ठिकाणी स्थायिक झाले. शिवसेनेकडं १९९०, १९९५, १९९९ मध्ये झालेल्या पालघरच्या विधानसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून सक्षम उमेदवार उभा राहत नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर गावित त्यांनी पालघरच्या राजकारणात २००३ च्या सुमारास प्रवेश केला. आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वतः शिक्षित असल्यानं गावित यांनी २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून आपली उमेदवारी मिळवली. या निवडणुकीत ते पराभूत झाल्यानंतरदेखील त्यांनी काँग्रेसच्या पक्षकार्यात सहभाग घेण्याचं सुरू ठेवलं. त्याचं फलित म्हणून त्यांना २००९ मध्ये काँग्रेसतर्फे आमदारकी व पुढं सव्वा वर्ष राज्यमंत्रिपद मिळालं होते.


२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा ५१५ मतांनी निसटता पराभव झाला होता; मात्र त्या वेळी विजयी झालेल्या आमदार कृष्णा घोडा यांचं निधन झाल्यानं २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत गावित काँग्रेसतर्फे पुन्हा रिंगणात उतरले होते. या पराभवानंतर काँग्रेसमधील एका गटांनी त्यांच्याविरुद्ध बंड पुकारलं होतं. काँग्रेसनं स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्यावं, असा मतप्रवाह पुढं आल्यानं आ. गावित व्यथित झाले होते. जानेवारी २०१८ मध्ये खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश घेतल्यानंतर भाजप सक्षम उमेदवाराच्या शोधात होता. त्या वेळी भाजपच्या गळाला गावित लागले व त्यांनी ती पोटनिवडणूक जिंकली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पालघरची जागा लढवण्यासाठी शिवसेनेनं हट्ट धरल्यानं गावित यांनी शिवसेनेत पक्षांतर करून त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. दरम्यान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला भाजपनं त्यांना उमेदवारी पुन्हा देण्याचं टाळलं; मात्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपत असतानादेखील शिवसेना शिंदे गटानं त्यांना उमेदवारी दिल्यानं विद्यमान आमदार श्रीनिवास यांनी आपली नाराजी व कैफियत माध्यमांसमोर मांडली व गावित पुन्हा चर्चेत आले. पुन्हा शिवसेनेत आल्यानंतर ते विजयी झाले. २००३ पासून पालघरच्या राजकारणात सक्रिय असणारे आ. गावित हे त्या वेळी असणाऱ्या इतर संभाव्य उमेदवारांपेक्षा अधिक शिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना विविध उपक्रम राबवण्यासाठी ते सढळ हस्ते मदत करीत असत. दिल्लीमधील संपर्कामुळं पालघरमधील काही ज्वलंत प्रश्न मांडून त्यांनी केंद्र सरकारकडं पाठपुरावा सुरू करून यश मिळवलं होतं. ते आपल्या मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क ठेवून त्यांच्या सुख दुखात आवर्जून सहभागी होतात. पालघर जिल्हा निर्मिती प्रक्रियेत त्यांनी निर्णायक भूमिका बजावली. दोन दशकांच्या कालावधीत प्रत्येक गाव खेड्यात त्यांचा थेट संपर्क निर्माण झाला असून वैयक्तिक संपर्कातील निर्णायक मतं असल्याचं मानलं जातं. लोकप्रतिनिधी असताना त्यांनी शासकीय यंत्रणेचा पुरेपूर वापर केला व तळागाळापर्यंत पोहोचले. शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी वैयक्तिक एजन्सीची नेमणूक केली होती. विविध राजकीय पक्षांमध्ये वरिष्ठ नेते त्यांच्या संपर्कात असून अशा नेत्यांकडे लॉबिंग करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. थेट संपर्क, आर्थिक स्थैर्य, चिकाटी वृत्ती, कुशल राजकारणी असल्यानं गावित यांना पालघरच्या राजकारणात प्राधान्य मिळत आलं आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!