Breaking News
‘भाजप जिल्हाध्यक्षांच्या बदनामीवरून महायुतीत तणाव’ शिवसेनेच्या शिंदे गटाविरुद्ध भाजप आक्रमक थेट बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार राजीव नानांच्या पुढाकाराने ‘प्रोटेक्ट एन. जि.ओ.’पालघर जिल्ह्याचे हित जपणार. भरत राजपूतच पालघरचे ‘किंगमेकर’ पालघर जिल्ह्यात भाजपला मिळवून दिल्या ९४ पैकी पन्नास जागा विरोधकांच्या एकीलाही शह राज -उद्धव ठाकरे एकत्र, आज दुपारी ऐतिहासिक युतीची घोषणा, जागावाटप ठरलं, कोण किती जागांवर लढणार? वाचा मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांच्या मोबाईलचेही सुरु राहणार कॅमेरे; प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही, यंदा प्रथमच पर्यवेक्षकांची सरमिसळ
banner 728x90

राज -उद्धव ठाकरे एकत्र, आज दुपारी ऐतिहासिक युतीची घोषणा, जागावाटप ठरलं, कोण किती जागांवर लढणार? वाचा

banner 468x60

Share This:

मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी युतीची अधिकृत घोषणा आज २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित येत या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब केले. या युतीमुळे मुंबईच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“मुंबईच्या राजकारणात ‘दोन वाघ’ अखेर एकत्र आले आहेत! मातोश्री आणि शिवतीर्थातील दुरावा संपवून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी हातमिळवणी केली आहे. २२७ जागांच्या लढाईत ‘युती’चा फॉर्म्युला ठरला असून, दुपारी १२ वाजता होणाऱ्या या घोषणेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पहा, या महायुतीमुळे कोणाचे धाबे दणाणले आहेत…”

संजय राऊत यांचे ट्विट

खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून या युतीवर भाष्य केले आहे. “दुपारी १२ वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येऊन अधिकृत घोषणा करतील,” असे राऊत यांनी स्पष्ट केले होते. दोन्ही भावांमधील हा राजकीय समेट मुंबई महानगरपालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी आणि विरोधकांना शह देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

banner 325x300

बीएमसी निवडणुकीचे संभाव्य ‘सीट शेअरिंग’ फॉर्म्युला

मुंबईच्या एकूण २२७ प्रभागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे.
शिवसेना (UBT): १४५ ते १५० जागांवर निवडणूक लढवणार.
मनसे (MNS): ६५ ते ७० जागा राज ठाकरे यांच्या पक्षाला मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार गट): महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शरद पवार गटासाठी १० ते १२ जागा सोडण्यात आल्या आहेत.
रणनीती: जिथे शिंदे गट तिथे मनसेची ताकद!

२०१७ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने जिंकलेल्या १२ ते १५ जागा मुद्दाम मनसेला देण्यात आल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, या जागांवरील माजी नगरसेवक सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. तिथे उद्धव ठाकरे गटाकडे तगडे उमेदवार नसल्याने, मनसेच्या सक्षम उमेदवारांना संधी देऊन ‘शिंदे गटाला’ रोखण्याची ही रणनीती असल्याचे बोलले जात आहे.

खरा वारसदार कोण?’ या लढाईला धार

एकनाथ शिंदे यांनी ‘बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना’ असा दावा करत सत्ता मिळवली. मात्र, आता उद्धव आणि राज हे ठाकरे कुटुंबातील दोन्ही वारसदार एकत्र आल्याने, “खरी शिवसेना आणि ठाकरेंचा वारसा” कोणाकडे आहे, या भावनिक मुद्द्यावर शिंदे गटाची कोंडी होऊ शकते.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!