banner 728x90

राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, शरद पवारांची मागणी…

banner 468x60

Share This:

राज्यात अतिवृष्टी जी झाली त्यातील शेतकरी, पिकं यांचे अतोनात नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात ऊस महत्त्वाचे पीक आहे आणि आमच्याकडे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचे मोठे नुकसान झालं आहे.

काही ठिकाणी ऊस वाहून गेला, काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या त्यात किती नुकसान झालं आहे, याचा आढावा घेण्याची गरज होती. उद्याच्या १२ तारखेला governing council, सगळ्या साखर कारखान्यांची बैठक सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने जास्त मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा आहे, असे शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्य सरकारने नुकसान ज्यांचे झाले त्यांना मदत करण्याची गरज असताना ऊस उत्पादकांकडून एक मोठी रक्कम मुख्यमंत्री निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक यांच्याकडून सक्तीचं वसुली करणे, चुकीचं आहे. तसेच आज शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री यांनी याबद्दल फेरविचार करावा, असे शरद यांनी आपले मत व्यक्त केले. मराठवाड्यातील परिस्थितीचा राज्य सरकारने अंतिम प्रस्ताव केंद्राकडे दिलेला नाही. माझा आग्रह आहे की, राज्य सरकारने अंतिम प्रस्ताव केंद्राकडे द्यावा आणि केंद्राची मदत लवकर होईल हे बघावं. राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन जबाबदारी दिली पाहिजे. राज्यातील काही ठराविक जिल्हे आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. लवकरात लवकर तिथे मदत सुरू करावी, असेही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजे. संपूर्ण राज्यात ही स्थिती नाही, राज्यातील काही जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे. या जिल्ह्यात अधिकारी, कर्मचारी depute करावे आणि सर्व रेकॉर्ड करून मदत सुरू करावी.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!