औरंगाबाद : सलमान शेख – मोदी सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर औरंगाबाद शहरात तरूणाई मंडळीकरून जोरदार प्रतिसाथ मिळाला आहे. गेल्या 5 दिवसात सुमारे 60 हजार तरुणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे शहरात लसीकरणाचा 4 लाखांचा टप्पा पार पूर्ण झाला आहे. उर्वरित दुसरा डोस घेण्यासाठीही नागरिक आता विविध केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. शहरात दररोज 12 ते 14 हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. असे असताना 22 जूनपर्यंत 69 केंद्राच्या माध्यमातून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजिले होते. 24 जूनपर्यंत शहरात 3 लाख 93 हजार 153 जणांचे लसीकरण झाले होते. त्यात 18 ते 44 वयोगटातील संख्या 76 हजार 765 एवढी होती. शुक्रवारी दिवसभरात 14 हजार पेक्षाही अधिक लसीकरण झाल्याने शहराने लसीकरणाचा 4 लाखाचा टप्पा पाड केला आहे.
कौतुकास्पद! औरंगाबादकरांनी पार केला लसीकरणाचा ‘चार’ लाखांचा टप्पा
दरम्यान, शहरात जलतगतीने लसीकरण पूर्ण करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने विविध सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विविध सोसायट्यामध्येही आता लसीकरण केले जाणार आहे.
Recommendation for You

Post Views : 68 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या दीव दमण या केंद्रशासित…

Post Views : 68 जव्हार:दिनांक 11 फेब्रुवारी आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये गेल्या २० वर्षांपासून धुलाई…

Post Views : 68 पालघर-योगेश चांदेकररेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्रसामाजिक कार्यकर्त्याच्या मागणीची दखल पालघरः पालघर शहराचे पश्चिम…













