औरंगाबाद : सलमान शेख – मोदी सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर औरंगाबाद शहरात तरूणाई मंडळीकरून जोरदार प्रतिसाथ मिळाला आहे. गेल्या 5 दिवसात सुमारे 60 हजार तरुणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे शहरात लसीकरणाचा 4 लाखांचा टप्पा पार पूर्ण झाला आहे. उर्वरित दुसरा डोस घेण्यासाठीही नागरिक आता विविध केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. शहरात दररोज 12 ते 14 हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. असे असताना 22 जूनपर्यंत 69 केंद्राच्या माध्यमातून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजिले होते. 24 जूनपर्यंत शहरात 3 लाख 93 हजार 153 जणांचे लसीकरण झाले होते. त्यात 18 ते 44 वयोगटातील संख्या 76 हजार 765 एवढी होती. शुक्रवारी दिवसभरात 14 हजार पेक्षाही अधिक लसीकरण झाल्याने शहराने लसीकरणाचा 4 लाखाचा टप्पा पाड केला आहे.
कौतुकास्पद! औरंगाबादकरांनी पार केला लसीकरणाचा ‘चार’ लाखांचा टप्पा
दरम्यान, शहरात जलतगतीने लसीकरण पूर्ण करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने विविध सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विविध सोसायट्यामध्येही आता लसीकरण केले जाणार आहे.
Recommendation for You

Post Views : 49 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 49 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 49 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 49 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












