नवी दिल्ली : कोरोनाचा संभाव्य तिसरी लाट आणि डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता देशात कडक निर्बंध लावले जात आहे. असे असताना केंद्र सरकारने 31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 31 जुलैपर्यंत भारतातून होणारी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी एक महिन्याची असणार आहे.
देशात 31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द
मात्र मोजक्या मार्गावरील काही आंतरराष्ट्रीय उड्डाणाना अपवादात्मक परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकते. यासंबंधी केंद्र सरकारकडून पत्र जारी करण्यात आले आहे. यात विमान महासंचालयाने सांगितले आहे की, 31 जुलै 2021 च्या रात्री 11.59 वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंदी असणार आहे. भारताने अनेक देशात हवाई करार केला असून, अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिरात, केनिया, भूतान आणि फ्रान्स यासह 27 देशांसोबत करार केल्याने त्यांच्या विमान कंपन्या विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालू शकतात.
Recommendation for You

Post Views : 71 राज्यातील पालघर जिल्ह्यातील एका औषध (फार्मास्युटिकल) निर्मिती कारखान्यात आज सकाळी भीषण…

Post Views : 71 पालघर-योगेश चांदेकरआमदार राजेंद्र गावित यांनी मांडली होती लक्षवेधी पालघरः पालघर जिल्ह्यातील…

Post Views : 71 पालघर-योगेश चांदेकरखा. डॉ. हेमंत सवरा यांची माहितीअभियानाचा नागरिकांना फायदा होणार पालघरः…

Post Views : 71 पालघर-योगेश चांदेकर तलासरी व डहाणू तालुक्यातील जनता दरबारात तक्रारींचे जागीच निवारण…












