banner 728x90

देशात 31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

banner 468x60

Share This:

नवी दिल्ली : कोरोनाचा संभाव्य तिसरी लाट आणि डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता देशात कडक निर्बंध लावले जात आहे. असे असताना केंद्र सरकारने 31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.  31 जुलैपर्यंत भारतातून होणारी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी एक महिन्याची असणार आहे. 

मात्र मोजक्या मार्गावरील काही आंतरराष्ट्रीय उड्डाणाना अपवादात्मक परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकते. यासंबंधी केंद्र सरकारकडून पत्र जारी करण्यात आले आहे. यात विमान महासंचालयाने सांगितले आहे की, 31 जुलै 2021 च्या रात्री 11.59 वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंदी असणार आहे. भारताने अनेक देशात हवाई करार केला असून, अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिरात, केनिया, भूतान आणि फ्रान्स यासह 27 देशांसोबत करार केल्याने त्यांच्या विमान कंपन्या विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालू शकतात.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!