आळंदी : आषाढी वारीसाठी कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट आणि डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. वारीला सुरुवात होत असतानाच आता कोरोनानं वारीत शिरकाव केल्याची माहिती मिळाली आहे. माऊलीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी निवडण्यात आलेल्या 100 वारकऱ्यांपैकी 2 जणांना कोरोनाची लागण झाली. ही माहिती मिळताच काहीसं गोंधळाचं वातावरण झालं आहे. तर दर्शनासाठी आलेल्या लोकांपैकी 20 जणांचेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानापूर्वीच आळंदीत, 20 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह
50 लोकांना माऊलीच्या दर्शनासाठी परवानगी टप्प्या टप्प्यानं देण्यात आली होती. त्यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 164 जणांचे रिपोर्ट आले असून 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. उद्या माऊलीचं प्रस्थान दुपारी होण्याची शक्यता असतानाच आता वारकऱ्यांची चिंता वाढली आहे. विठुरायाच्या भेटीसाठी तुकोबारायांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळ्यासाठी केवळ वारकऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे.
Recommendation for You

Post Views : 53 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 53 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 53 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 53 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












