औरंगाबाद : सलमान शेख – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि कमी प्रवास संख्या यामुळे इंडिगोने औरंगाबादहून सुरू असलेली सर्व विमाने रद्द केली होती. मात्र आता कोरोनाचा प्रकोप ओसरल्याने अखेर इंडिगोने विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 5 जुलैपासून दिल्ली ते हैदराबाद विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. त्यामुळे बंद झालेली हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस तर औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा आठवड्यातून चार दिवस चालणार आहे. सध्या शहरात एअर इंडियाची विमानसेवा सुरू असून, मुंबई आणि दिल्ली प्रवास विमानसेवा उपलब्ध आहे. इंडिगोकडून लवकरच औरंगाबाद- बंगळुरु आणि अहमदाबाद ही विमानसेवा सुरू होणार आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव आणि लागू करण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे इंडिगोने आपली सेवा बंद केली होती. मात्र आता औरंगाबादकरांना इंडिगोच्या विमानसेवेचा लाभ मिळणार आहे.
इंडिगोचे दिल्ली, हैदराबाद विमान 5 जुलैपासून पुन्हा घेणार औरंगाबादेत ‘उड्डाण’
Recommendation for You

Post Views : 58 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 58 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 58 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 58 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












