मुंबई: राज्यात कोरोनाचा वेग मंदावला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 9 हजार 830 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 236 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 59 लाख 44 हजार 710 इतका झाला असून, मृतांचा आकडा 16 हजार 26 झाला आहे. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यात 1 लाख 39 हजार 960 जणांवर उपचार सुरू आहेत.
दिलासादायक! राज्यात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 9,830 नवे कोरोना रुग्ण
गेल्या 24 तासात 5 हजार 890 जणांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत 56 लाख 85 हजार 636 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 95.64 टक्के इतका आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा वेग जरी मंदावला असला तरी, कोरोना संबंधित शासनाने लादलेले नियम पाळणे गरजेचे आहे.
Recommendation for You

Post Views : 72 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या दीव दमण या केंद्रशासित…

Post Views : 72 जव्हार:दिनांक 11 फेब्रुवारी आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये गेल्या २० वर्षांपासून धुलाई…

Post Views : 72 पालघर-योगेश चांदेकररेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्रसामाजिक कार्यकर्त्याच्या मागणीची दखल पालघरः पालघर शहराचे पश्चिम…













