banner 728x90

अजित पवार यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळात बदलाची शक्यता; एनसीपीच्या सर्वच खात्यांवर पक्षाचा दावा

banner 468x60

Share This:

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर (DCM Ajit Pawar Death) महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून राज्य मंत्रिमंडळात लवकरच कॅबिनेट रिअरेंजमेंट (Maharashtra Cabinet Reshuffle) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार हे बदल येत्या काही आठवड्यांत होऊ शकतात, तर त्याचा केंद्रबिंदू मुंबईतील सत्ताकेंद्रात असणार आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे असलेली अर्थ, नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती, तसेच अतिरिक्त जबाबदारी म्हणून क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही दोन खाती सध्या रिक्त झाली आहेत. एनसीपी पक्षातील जवळपास सर्वच नेत्यांची ठाम भूमिका आहे की ही सर्व खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहावीत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आणि शिवसेनालाही (BJP And Shivsena Shinde) या मागणीवर कोणतीही हरकत नसल्याचे संकेत मिळत आहेत.

एनसीपीकडून आधी अंतर्गत पातळीवर चर्चा करून कोणत्या नेत्याला कोणते मंत्रीपद द्यायचे, याचा निर्णय घेतला जाईल. त्यानंतर महायुती सरकारकडून होणारा कॅबिनेट रिअरेंजमेंट (Maharashtra Cabinet Rearrangment) हा केवळ औपचारिकतेचा भाग असेल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर एनसीपीच्या नेतृत्वाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण होणार? उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार? बारामतीचा राजकीय वारसा कोणाच्या हाती जाणार? तसेच आगामी निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का, असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीपीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात येणार असून त्यातच पक्षाध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. (When) ही बैठक किमान 15 दिवसांनंतर होण्याची शक्यता आहे. सध्या पवार कुटुंब शोकाकुल अवस्थेत असून, सूतकाचे 13 दिवस पूर्ण झाल्यानंतरच या विषयावर कोणताही निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका पक्षाकडून मांडण्यात आली आहे.

या प्रक्रियेनंतरच उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय, बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कुटुंबातील कोणाला उमेदवारी द्यायची, तसेच जिल्हा परिषद निवडणुकांनंतर दोन्ही एनसीपी एकत्र येतील की नाही, यावर स्पष्टता येणार आहे.

दरम्यान, आगामी जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता काही जागांवर दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये आघाडी होण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्यासारखे नेते समन्वयाची भूमिका बजावणार असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांत अशाच प्रकारचे आघाडीचे प्रयोग झाले होते. मात्र ही चर्चा सध्या केवळ निवडणूक आघाडीपुरती मर्यादित असून, पूर्ण पक्षविलीनीकरणाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

banner 325x300

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!