नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी गेल्या 6 महिन्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेकदा यासंदर्भात बैठकी झाल्या मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. जो पर्यंत सरकार हे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. मात्र देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे शेतकरी आंदोलनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता.
Farmers Protest : देशभरातील राजभवनांना शेतकरी घेराव घालणार, टिकैत यांची घोषणा
परंतु आता ही लाट ओसरल्याने आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. देशातील प्रत्येक राजभवनावर शेतकरी घेराव घालणार अशी घोषणा राकेश टिकैत यांनी दिली आहे. 26 जून रोजी देशभरात ‘लोकशाही वाचवा, शेतकरी वाचवा’ हा दिवस साजरा करणार आहे. शेतकरी आंदोलनाला सात महिने होत आले असून, सरकारने त्यात कोणत्याही प्रकारे तोडगा काढला नाही त्यामुळे आता राष्ट्रपतींनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी भूमिका टिकैत यांनी मांडली आहे.
Recommendation for You

Post Views : 134 सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU)…

Post Views : 134 मासेमारी बंदी कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्ट पासून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी जिल्ह्याच्या…

Post Views : 134 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पाम ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना दत्तात्रय पिंपळे यांच्या विरोधात…

Post Views : 134 पालघर-योगेश चांदेकर शिक्षणाच्या प्रवाहात कातकरी समाजाला आणण्यासाठी विशेष उपक्रम पालघरः पालघर…