नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी गेल्या 6 महिन्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेकदा यासंदर्भात बैठकी झाल्या मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. जो पर्यंत सरकार हे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. मात्र देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे शेतकरी आंदोलनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता.
Farmers Protest : देशभरातील राजभवनांना शेतकरी घेराव घालणार, टिकैत यांची घोषणा
परंतु आता ही लाट ओसरल्याने आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. देशातील प्रत्येक राजभवनावर शेतकरी घेराव घालणार अशी घोषणा राकेश टिकैत यांनी दिली आहे. 26 जून रोजी देशभरात ‘लोकशाही वाचवा, शेतकरी वाचवा’ हा दिवस साजरा करणार आहे. शेतकरी आंदोलनाला सात महिने होत आले असून, सरकारने त्यात कोणत्याही प्रकारे तोडगा काढला नाही त्यामुळे आता राष्ट्रपतींनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी भूमिका टिकैत यांनी मांडली आहे.
Recommendation for You

Post Views : 339 पालघर-योगेश चांदेकर पालघरः ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते…

Post Views : 339 जिल्ह्यात दरवर्षी किमान २५० कोटी रुपयांची विकास कामे नगरपरिषद, नगरपंचायत यांच्यामार्फत…

Post Views : 339 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अनुदानित रासायनिक खते उपलब्ध करून देण्यासाठी खत वितरणाची…

Post Views : 339 पालघर-योगेश चांदेकर पोलिस अधीक्षक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पथकमुख्यमंत्र्यांचे पोलिस महासंचालकांना…

Post Views : 339 राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील अच्छाड–दहिसर मार्गावर ६ पादचारी उड्डाणपुलांसाठी निविदा…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg