मुंबई : यंदाच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशानंतर राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी चांगली रंगलेली पाहायला मिळत आहे. तसेच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात विरोधकांवर आरोप करण्यात येत आहे. याच आरोपांवर भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे – आमदार गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर यांनी ट्विट केले असून, त्यामध्ये त्यांनी राऊतांनी सामनाच्या अग्रलेखात मुळात त्यांना 12 आमदारांचं शल्य बोचतंय, हा कबूली जबाबच नोंदवला. परंतू एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर, नाभिक समाजातील गजानन कडू वाघ, कोविड योद्धा डॉ. गणेश शेळके यांना ठाकरे सरकारच्या भोंगळ कारभारामुळे आपली जीवन यात्रा संपवावी लागली असल्याचं म्हटलं आहे.
या सगळ्याविषयी खरंतर ठाकरे सरकारला काहीच देणंघेणं नाहीये. फक्त मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे, पण जबाबदारीपासून मात्र पळ काढायचा असल्याचं म्हणतच गोपीचंद पडळकरांनी ठाकरे सरकारवर आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला आहे.
Recommendation for You

Post Views : 108 पालघर आगारात प्रवाशांच्या सेवेत पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचा समावेश करण्यात…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील…

Post Views : 108 शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत…

Post Views : 108 पालघर-योगेश चांदेकर पालघर- आधुनिक पालघरच्या निर्मितीत आणि विकासाच्या प्रक्रियेत राजेंद्र गावित…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg