वाडा : संजय लांडगे – ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित करण्यासाठी ओबीसी समाजातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आज (24 जून) पालघर जिल्ह्यातील सर्वच तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आक्रोश आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
ओबीसींचे तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आक्रोश आंदोलन
सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारने पुनर्प्रस्थापित करावे, पदोन्नतीतील रद्द केलेले आरक्षण पुर्ववत करावे, जातनिहाय जनगणना करण्यात यावी या तीन प्रमुख मागण्यांसाठी हे आक्रोश आंदोलन करण्यात आल्याचे वाडा तालुका ओबीसी आरक्षण समितीचे अध्यक्ष संदीप पवार यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाबाबतचे सर्व नियमांचे पालन करुन आयोजित केलेल्या या आक्रोश आंदोलनामध्ये ओबीसी समाजातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते ओबीसीच्या एका झेंड्याखाली एकत्र आले होते. या आक्रोश आंदोलनात काही सामाजिक कार्यकर्ते तसेच ओबीसी समाजातील शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. ओबीसी आरक्षण समितीचे अध्यक्ष संदिप पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ओबीसी समितीचे नरेश आकरे, निलेश गंधे, दिलीप पाटील, उमेश खिराडे यांच्यासह सर्वच पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
ओबीसींच्या मागण्यांच्या घोषणा देऊन तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आक्रोश करण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
Recommendation for You

Post Views : 95 जिल्ह्यात दरवर्षी किमान २५० कोटी रुपयांची विकास कामे नगरपरिषद, नगरपंचायत यांच्यामार्फत…

Post Views : 95 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अनुदानित रासायनिक खते उपलब्ध करून देण्यासाठी खत वितरणाची…

Post Views : 95 पालघर-योगेश चांदेकर पोलिस अधीक्षक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पथकमुख्यमंत्र्यांचे पोलिस महासंचालकांना…

Post Views : 95 राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील अच्छाड–दहिसर मार्गावर ६ पादचारी उड्डाणपुलांसाठी निविदा…

Post Views : 95 पालघर-योगेश चांदेकर करजगाव घरफोडी प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसह, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg