सांगली : राज्यातील तीन चाकाच्या महाविकास आघाडी सरकारने राज्याला कोरोनाची राजधानी करून ठेवलंय. असे गंभीर आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केले आहे. सांगली दौऱ्यावर असताना शेलार यांनी हा आरोप केलाय. शेलार यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Home
पालघर
महाविकास आघाडी सरकारने राज्याला कोरोनाची राजधानी केलंय, भाजप नेते आशिष शेलार यांचा गंभीर आरोप
महाविकास आघाडी सरकारने राज्याला कोरोनाची राजधानी केलंय, भाजप नेते आशिष शेलार यांचा गंभीर आरोप
‘सध्या सांगली जिल्ह्यामध्ये लसीचा साठा अपुरा आहे. तसेच केंद्राने लसीकरणासाठीची जबाबदारी घेतली पाहिजे आणि मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध करून दिल्या पाहिजे’, असं म्हणत आशिष शेलार यांनी लसीच्या पुरवठयामध्ये लक्ष घातलं पाहिजे, असा पलटवार जयंत पाटील यांनी केला आहे.
सांगलीमधील बहुतांश नागरिक कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असताना विरोधी पक्षाने केंद्राला सांगून महाराष्ट्रात लसींचा साठा उपलब्ध करून द्यावा, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोना लसीच्या पुरवठयासंदर्भात केंद्र सरकार विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार असा वाद निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच केंद्राने संपूर्ण लसीकरणाची जबाबदारीही घेतली व नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र यावर आघाडी सरकार लसीकरणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे.
Recommendation for You

Post Views : 62 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 62 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 62 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 62 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












