सांगली : राज्यातील तीन चाकाच्या महाविकास आघाडी सरकारने राज्याला कोरोनाची राजधानी करून ठेवलंय. असे गंभीर आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केले आहे. सांगली दौऱ्यावर असताना शेलार यांनी हा आरोप केलाय. शेलार यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Home
पालघर
महाविकास आघाडी सरकारने राज्याला कोरोनाची राजधानी केलंय, भाजप नेते आशिष शेलार यांचा गंभीर आरोप
महाविकास आघाडी सरकारने राज्याला कोरोनाची राजधानी केलंय, भाजप नेते आशिष शेलार यांचा गंभीर आरोप
‘सध्या सांगली जिल्ह्यामध्ये लसीचा साठा अपुरा आहे. तसेच केंद्राने लसीकरणासाठीची जबाबदारी घेतली पाहिजे आणि मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध करून दिल्या पाहिजे’, असं म्हणत आशिष शेलार यांनी लसीच्या पुरवठयामध्ये लक्ष घातलं पाहिजे, असा पलटवार जयंत पाटील यांनी केला आहे.
सांगलीमधील बहुतांश नागरिक कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असताना विरोधी पक्षाने केंद्राला सांगून महाराष्ट्रात लसींचा साठा उपलब्ध करून द्यावा, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोना लसीच्या पुरवठयासंदर्भात केंद्र सरकार विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार असा वाद निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच केंद्राने संपूर्ण लसीकरणाची जबाबदारीही घेतली व नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र यावर आघाडी सरकार लसीकरणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे.
Recommendation for You

Post Views : 101 पालघर-योगेश चांदेकर पालघरः ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते…

Post Views : 101 जिल्ह्यात दरवर्षी किमान २५० कोटी रुपयांची विकास कामे नगरपरिषद, नगरपंचायत यांच्यामार्फत…

Post Views : 101 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अनुदानित रासायनिक खते उपलब्ध करून देण्यासाठी खत वितरणाची…

Post Views : 101 पालघर-योगेश चांदेकर पोलिस अधीक्षक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पथकमुख्यमंत्र्यांचे पोलिस महासंचालकांना…

Post Views : 101 राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील अच्छाड–दहिसर मार्गावर ६ पादचारी उड्डाणपुलांसाठी निविदा…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg