शासनाच्या कृती आराखड्यासह ‘व्यसनमुक्त महाराष्ट्र अभियान’ २५ जूनपासून सुरू होणार आहे अशी माहीत समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकार २५ जूनपासून महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी राज्यव्यापी अभियान सुरू करणार आहे.
मुंबईत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
महाराष्ट्रातील महायुती सरकार महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्याच्या तयारीत आहे. सरकार २५ जूनपासून राज्यभरात ‘व्यसनमुक्त महाराष्ट्र अभियान’ सुरू करत आहे. या महत्त्वपूर्ण अभियानाच्या यशासाठी मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांना सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पालकमंत्री आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या एका महत्त्वाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार आयोजित या बैठकीला महापौर रितू तावडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि पोलीस, महानगरपालिका, म्हाडा, एमआयडीसी व एमएमआरडीए यांसारख्या विविध विभागांतील सुमारे १६० वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आशिष शेलार यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती. सह-पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सन्माननीय उपस्थितीत झालेल्या या बैठकीत १६० सदस्य व्हिडिओ लिंकद्वारे सहभागी झाले होते.
तसेच, २५ जूनपासून राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या “अमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र अभियाना”मध्ये सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांना सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
“देणगी द्या नाहीतर मंत्रीपदाचा राजीनामा द्या!” पार्थ पवार यांच्या अल्टिमेटममुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg